HW News Marathi
महाराष्ट्र

‘मराठा, ओबीसी, धनगर समाजाप्रति भाजपचे प्रेम पुतणा मावशीचं’, विनायक राऊतांचा भाजपला खोचक टोला!

नवी दिल्ली। संसदेत १२७ व्या घटनादुरुस्तीचे विधेयक पारित करण्यात आले आहे. या विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. आरक्षणामधील ५० टक्क्याची मर्यादा शिथिल करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मराठा, ओबीसी, धनगर समाजाप्रति भाजपचे प्रेम पुतणा मावशीचं आहे. संसदेत घटना दुरुस्तीला समर्थन न करुन मराठा आणि धनगर समाजाचा विश्वासघात भाजप खासदार यांनी केला असल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याची गरज भासली तर तशी मुभा केंद्र सरकारने राज्याला दिली पाहिजे असे मत विनायक राऊत यांनी मांडले आहे.

शिवसेनेच्या वतीने दुरुस्ती सुचवण्यात आली

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी विनायक राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. विनायक राऊत यांनी म्हटलं आहे की, राज्यांना अधिकार देताना ते अधिकार फुलप्रूफ दिला पाहिजे. यासाठी शिवसेनेच्या वतीने दुरुस्ती सुचवण्यात आली होती. कारण विधेयकामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते. १०२ व्या घटनादुरुस्तीचा अधार घेऊन आणि त्याचबरोबर इंद्रा सहानी खटल्याचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची याचिका फेटाळली होती. ती अभ्यास करता १२७ व्या घटनादुरुस्तीचं विधेयक मंजूर करत असताना ते अधिकार पुन्हा राज्याला बहाल करताना राज्याला पुन्हा अडचणी येणार नाहीत. याची दक्षता केंद्र सरकारने घेतली पाहिजे होती.

५० टक्क्याची मर्यादा ओलांडण्याची मुभा राज्य सरकारला असली पाहिजे

हे विधेयक अस्पष्ट असून बऱ्याच शंका या विधेयकामध्ये होणार आहे. या शंकेचं निरसण करुन राज्य सरकारला ५० टक्क्यांची मर्यादा ओलंडण्याची गरज भासली तर ती मुभा राज्य सरकारला असली पाहिजे. असे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.सर्व समाजाला त्यांच्या संख्येच्या अधिक आरक्षण द्यायचे झाले तर सहाजीकच आहे की, कोणत्याही राज्याला या घटना दुरुस्तीचा फायदा होणार नाही. उलट त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण होतील यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने दुरुस्ती सुचवली होती. .त्या दुरुस्तीमध्ये राज्याला ५० टक्क्याची मर्यादा ओलांडण्याची मुभा राज्य सरकारला असली पाहिजे अशी दुरुस्ती सुचवली होती.

त्या भाजपचे बिंग संसदेत फुटलं

सभागृहात दुरुस्ती सुचवली गेली ती त्यावेळी मतास टाकली गेली त्यावेळी काँग्रेससह इतर सर्व पक्षांनी या दुरुस्तीला पाठींबा दिला परंतू मराठा , धनगर आणि इतर समाजाच्या आरक्षणाबाबत कळवळा आला होता त्या भाजपचे बिंग संसदेत फुटलं आहे. भाजपचे मराठा,ओबीसी, धनगर आरक्षणाच्या समाजाबाबतचे प्रेम हे पुतणा मावशीचं प्रेम आहे. हे दिखाऊपण आहे. दुरुस्तीला समर्थन न करुन मराठा आणि धनगर समाजाचा विश्वासघात भाजप खासदारांनी केला आहे. यामुळे पर्यायाने भाजप मराठा आणि धनगर समाजाच्या बाबत बोलत होता याचे उलट सभागृहात झालं आहे. भाजप नेत्यांचा आता आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी तो गमावला असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपचा जो मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत खोटा मुखवटा होता तो फाडला गेला आहे. मराठा समाजाने, धनगर समाजाने भाजपच्या खोट्या मुखवट्यापासून सावध राहिले पाहिजे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोणी ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर विश्वविक्रमी रस्ता बांधकाम

Aprna

“भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते वाजपेयी आणि नेहरू”- नितीन गडकरी

News Desk

नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास!

News Desk