HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज (१५ ऑक्टोबर) संकल्प पत्र जाहीर केले आहे. यात भाजपने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार, असल्याचे आश्वासन त्यांच्या संकल्प पत्रात दिले आहे. तसेच राज्यातील रस्त्यांची कायमस्वरूपी देभभाल दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार, असल्याचे आश्वसन देखील संकल्प पत्रात देण्यात आले आहे. भाजपने त्यांच्या संकल्प पत्रात आश्वासनाचा पाऊस पाडला आहे.

भाजपच्या संकल्प पत्रात वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, सर्वव्यापी – सर्वसमावेशी विकास, राज्याचा अभिमानास्पद वारसा, सुरक्षित महाराष्ट्र, आरोग्य, महिला, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास – जलवाहतूक, सिंचन, पाणीपुरवठा व ग्रामविकास, रेल्वे विकास, सुराज्य, शेती सुविधा, रस्ते विकास, दुष्काळमुक्ती, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा, बंदर विकास आणि जलवाहतूक, भक्कम गतिमान रेल्वेमार्ग, वीज पुरवठा व निर्मिती, रस्ते विकास, सुरक्षित महाराष्ट्र आणि सर्वव्यापी विकास या महत्तवाच्या मुद्यावर भर देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा संकल्प पत्र जारी करण्यात आला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज’, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती…

News Desk

“…म्हणून आशिष शेलार यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं” – चंद्रकांत पाटील

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! राजद्रोहाचे कलम तूर्तास स्थगित

Aprna