HW News Marathi
महाराष्ट्र

“महापालिका निवडणुकात शिवसेना टिकणार नाही!”, नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनाशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रा सुरु करताच त्यांनी पहिला निशाणा त्यांनी ठाकरे सरकारवर साधला आहे. ‘ठाकरे सरकारचे वाभाडे काढणार’ अशी चाहूल त्यांनी दिली होती आणि अगदी तसंच ते ठाकरे सरकारचे वाभाडे काढताना दिसत आहेत. त्यामुळं राणे आणि शिवसेना, या दोघांच्या भूमिकेकडे आज लक्ष असणार आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, शिवसेनेवर प्रहार करण्यासाठी भाजपकडून राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची रुपरेषा आखण्यात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

काही गोष्टी त्यांच्या कानावर जायलाच पाहिजेत

नारायण राणे यांची जनयात्रा चालू असताना त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मी जिथं उभा आहे, तिथून बाजूलाच कलानगर आहे. त्यामुळे, काही गोष्टी त्यांच्या कानावर जायलाच पाहिज्यात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या इंच इंच जमिनीवर महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे.

त्यामुळे, कुणीही विनाकारण आपल्याला झेपणार नाहीत, अशा गोष्टी बोलू नयेत. अन्यथा येणाऱ्या महापालिकेत गेल्या 2 वर्षात तुम्ही येथील जनतेला कसं पाठीमागे टाकंल, याचा उद्धार होणारच आहे. पण, येथील जनता तुमच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेचा कारभार तुमच्या हातात राहणार नाही, असे राणेंनी म्हटले. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रीपद दिलं, त्यामुळे मला आपली सोबत हवीय, असेही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे आधी शिवसैनिक होते, मात्र आता त्यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला आहे. यावर विनायक राऊत यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

राणे जिथे शिवसेनेविरोधात उभे राहतात, तिथे शिवसेनेचाच विजय

“राणे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेविरोधात उभे राहतात, तिथे तिथे शिवसेनेचाच विजय होतो हा इतिहास आहे. राणेंचं पानिपत करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. राणे समोर असल्यावर ही ताकद आणखीनच वाढते. त्यामुळे भाजपने राणेंवर मुंबईच काय ठाणे महापालिका आणि इतर महापालिकेची जबाबदारी दिली तरी सर्वत्र शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही”, असं ते म्हणाले आहेत.

महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत

राज्यसरकारच्या कामावरून नारायण राणे त्यांना नेहमीच सुनावत असतात. यावेळेस त्यांनी राज्यसरकारचे वाभाडे काढणार असल्याचं बोले आहेत. “महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत. 16 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात जाणार आहे. त्यांचं जे काही काम चालू आहे, राज्य ज्या पद्धतीने अधोगतीकडे नेहण्याचं काम करत आहेत. त्यावर बोलण्याचा प्रयत्न करेन. राज्यातील लोकांना जागृत करेन. त्यातच केंद्रामध्ये महाराष्ट्राला दिलेल्या न्यायाबद्दलही माहिती देईन”, असं यावेळी राणे म्हणाले आहेत.

तसेच राज्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. चिपळूणसह कोकणमध्ये पुन्हा एकदा पाहणीसाठी जाणार आहे. मी कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर आमच्या मंत्र्यांनी 700 कोटी रुपयांची मदत केली. अन् मुख्यमंत्री गेल्यानंतर फक्त दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. लोकांनी ते पैसे पिंपात टाकले, उद्धव ठाकरे यांच्या नावाने ते फुगून बाहेर येतील, अशी खिल्ली राणे यांनी ठाकरे सरकारची उडवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपची उत्तराखंडमध्ये काँग्रेसवर टीका!

News Desk

किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप, मंजुरीसाठी दिल्लीला पाठवणार

News Desk

‘वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी शासकीय आणि खासगी भागिदारी धोरणाला मंजुरी’ -अमित देशमुख

News Desk