HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचा पुढच्या महिन्यात सरपंच मेळावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई- ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप अव्वल असल्याचा दावा मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपने सर्वाधिक १२०० ग्रामपंचायती जिंकल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. शिवाय दुसऱ्या टप्प्यात आज होत असलेल्या ६९५ पैकी ३७८ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्याचा दावाही त्यांनी केला.

सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपने जिंकल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर सोशल मिडीयावरही भाजपने केलेल्या दाव्याची थट्टा उडवली जात होती. त्यात काँग्रेसने आपणच सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला होता. तसाच दावा राष्ट्रवादी काँग्रेसनेही केला होता. या पार्श्वभूमिवर आता पुढच्या महिन्यात भाजपकडून मुंबईत सरपंच मेळावा घेवून दुध का दुध पाणी का पाणी करून दाखवू असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यात भाजपचे सर्व सरपंच सहभागी होतील. त्यात किती सरपंच येतात ते सर्वांनाच पहायला मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. दिवाळी निमित्ताने वर्षा निवासस्थानी आयोजित औपचारीक गप्पावेळी ते बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुख राजीनामा देऊन थेट दिल्लीला रवाना

News Desk

विरोधकांनी मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये , राऊतांचा भाजपला टोला!

News Desk

राष्ट्रवादीने केली ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्‍याची घोषणा

News Desk