HW News Marathi
महाराष्ट्र

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट प्रकरण; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलीस सेलने भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर केलेल वक्तव्या हे आक्षेपार्ह नाही का?, असा उलट सवाल मुंबई सायबर सेलला केला आहे. तसेच चित्र वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील अपशब्दचा वापर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस हे धाडस दाखवणार आहे का?, असा सवाल करत पोलिसांना घेरले आहे. 

चित्र वाघ पुढे म्हणाल्या, “कायदा हा सर्वांना सारखा आहे. त्यामुळे प्रत्येकांने महिलांची मान मर्यादा जपली पाहिजे.” तसेच सायबर पोलीस सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांच्याकडून गजारियांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पंरतु शिवसेनात त्यांच्या सत्तेचा सत्ता दुरुपयोग करत असल्याचे गजारियांच्या वकिलांनी म्हटले असून भाजपचे नेत्यांनी गजारियांच्या ट्वीटचे समर्थन केले सायबर सेलच्या भाजपचे नेत्यांनी गजारियांच्या ट्वीटचे समर्थन केली.

चित्र वाघ नेमके काय म्हटल्या

चित्र वाघ म्हणाल्या, “आक्षेपार्ह लिखानाला समर्थन नाहीच जे लिहिले ते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी भर सभेत म्हटले. हे नाही याशिवायही महिलांचा अपमान करणारी वक्तव्य लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या ठिकाणी केली, करतात आहेत. अगदीच २० दिवसांपूर्वी शिवसेनेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देशाच्या महिला खासदार त्यांच्यावर केलेले व्यक्तव्य आक्षेपार्ह नव्हते का?, आणि मग त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे. यांची पण माहिती महाराष्ट्र सायबर सेलने देणे गरजेचे आहे. ऐवढेच नाही शिवसेनेचे खासदारांनी भाजपच्या नेत्यांना शिव्या दिल्या आहेत. आणि त्या सुद्धा संपूर्ण देशातील जनतेने घराघरात ऐकल्या आहेत. ते आक्षेपार्ह नाही का?, त्यांच्यावर कधी कारवाई होणार आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र पोलीस हे धाडस दाखवणार आहे का?, त्यामुळे कायदा हा सर्वांना सारखा आहे. त्यामुळे प्रत्येकांने महिलांची मान मर्यादा जपली पाहिजे.”  

https://twitter.com/ChitraKWagh/status/1479044101530030083?s=२०

नेमका वाद काय?

जितेन गजारिया हे भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’, असे म्हटले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करीत होते, पण अनेक राज्येच भाजपमुक्त झाली !

News Desk

“चिक्की घोटाळ्यात गुन्हे दाखल केले पाहिजे, ही माझी सुरुवातीपासूनची मागणी”

News Desk

डुकरांसोबत कुस्ती करू नये, हायड्रोजन बॉम्बवर फडणवीसांचे सूचक ट्वीट

News Desk