HW News Marathi
महाराष्ट्र

निवडणूकीला जो बायडन घेऊन या, संजय राऊतांचा भाजपला टोला

मुंबई। शिवसेनेचा आवाज होतो तेव्हा त्याला गर्जना म्हणतात. मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत आता शिवसेनाही उतरली आहे. सिल्वासाच्या इतिहासात सर्वात मोठा विजय होणार असल्याचे मत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. सातवेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला आगामी लोकसभा निवडणूकीत सहानभूतीची गरज नसल्याचेही ते म्हणाले. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मोठे मंत्री आता दादरा नगर हवेलीत दाखल झाले आहेत. रेल्वे मंत्र्यांच्या हजेरीवरूनही संजय राऊतांनी फिरकी घेतली. जो बायडन जरी आणले, तरी आम्ही घाबरत नाही, असे वक्तव्य राऊतांनी केले.

शिवसेनेने डेलकर कुटुंबीयांचा न्याय मिळवून देण्यासाठी हात पकडला आहे

रेल्वेमंत्री गेल्या चार दिवसांपासून सिल्वासामध्ये येऊन बसले आहेत. रेल्वे मंत्रालयाला काहीच काम नाही का ? की एअर इंडियासारखा लिलाव करून टाकला आहे ? असा सवाल त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये केंद्रातले संपुर्ण मंत्रीमंडळ विधानसभा निवडणूकीसाठी उतरले होते. पण ममता बॅनर्जींसमोर भाजपचे काहीच चालले नाही. त्याच पद्धतीने सिल्वासामध्ये भाजपचे काहीही चालणार नाही. सातवेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला सहानभूतीची गरज नाही, असेही ते म्हणाले. मोहन डेलकर यांनी कायम संघर्ष केला. शिवसेनेने डेलकर कुटुंबीयांचा न्याय मिळवून देण्यासाठी हात पकडला आहे, शिवसेना शेवटच्या श्वासापर्यंत सोबत लढणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे २०२४ लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे स्थान असणार आहे. त्याचीत सुरूवात ही सिल्वासापासून झालेली आहे. शिवसेनेसाठी दादरा नगर हवेलीची पोट निवडणूक ही स्वाभिमानाचा मुद्दा आहे. शिवसेना हे स्वाभिमानाचे दुसरे नाव असल्याचेही ते म्हणाले. शिवसेना मजबुतीने डेलकर कुटुंबीयांना साथ देणार असून आम्ही दिल्लीपर्यंत लढू असेही ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शरद पवारांना मी मोठे नेते म्हणून मानत नाही”!

News Desk

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३६४८, तर आत्तापर्यंत ३६५ रुग्णांची कोरोनावर मात

News Desk

आपलं सरकार असतानाही जर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा… काँग्रेसचा सल्ला

News Desk