HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार राज्यातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागलं लक्ष

मुंबई | महाराष्ट्रात पावसाने हाहाकार उडवला. कोकण, सांगली, सातारा, कोल्हापूरात पुराने तर लोकांचं जनजीवन विस्कळीत करुन टाकलं. दरड कोसळून आणि महापुरामुळं महाराष्ट्रात अतोनात नुकसानही झालं. .रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा यासह राज्यातल्या एकूण सात जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसलाय. आता या जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. नुकसानग्रस्तांसाठी आज मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.

काल वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी राज्यात पुरामुळं झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यासंदर्भातला अहवाल आज होणाऱ्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.आज (२८ जुलै) होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सरकार पुरग्रस्त भागाला किती आर्थिक मत जाहीर करणार याकडेही लक्ष लागले आहे. तसेच, कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्येही काही शिथिलता येणार का? लोकल ट्रेन संदर्भात काही निर्णय घेतला जाणार का? हे ही पाहणे महत्वाचे असणार आहे. या विषयांवरही आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का? – नवाब मलिक

News Desk

“इम्पेरिकल डेटा केंद्रानेच दिला पाहीजे”, छगन भुजबळांची माहिती

News Desk

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादींच्या याचिकेवर आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk