HW News Marathi
महाराष्ट्र

येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा – अनिल देशमुख

मुंबई | कोरोनाचे संकट आवासून उभे आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रात्री ११ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. मात्र रात्री ११ नंतर हे सर्व बंद होणार आहे. याचा अर्थ घराबाहेर जावून औषधे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही.

परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधने आहेत. जनतेने राज्यसरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन करतानाच मोठ्या शहरातील जी हिलस्टेशन आहेत तिथेही हेच निर्बंध पाळण्याच्या सूचना त्या- त्या जिल्हापोलिस अधिक्षकांना दिल्या असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या NCB अधिक्षकाला विनयभंगाप्रकरणी अटक!

News Desk

विधानसभाध्यक्षांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला

swarit

‘आमचा खून झाला तरी लढाई चालू राहिलं’, मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते

News Desk