HW News Marathi
महाराष्ट्र

नारळी पौर्णिमा साजरी करण्यावरून मनसेचं चॅलेंज, वातावरण तापणार?

मुंबई | करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रविवारी लॉकडाऊन असतानादेखील दादरमध्ये नारळी पौर्णिमेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नियमानुसार सध्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना जमण्यास बंदी आहे. पण तरीदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळी पौर्णिमा साजरी करणारच असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि मनसे असा सामना आज पाहायला मिळेल.

नारळी पौर्णिमा आज मुंबईत वातावरण तापवू शकते

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साजरी होणारी नारळी पौर्णिमा आज मुंबईत वातावरण तापवू शकते. कारण पोलिसांनी मनसैनिकांना १४९ नोटीस बजावली आहे. तरीदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम पार पाडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईत आजच वातावरण तापलेले पाहायला मिळेल.खरंतर, कोळी बांधवांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचं आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ, श्रीफळ अर्पण करतात आणि पूजा करतात. पण करोनाच्या नियमांमुळे आधीच लॉकडाऊन असताना मनसेमुळे मुंबईतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

कोळी बांधवांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचं आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ, श्रीफळ अर्पण करतात आणि पूजा करतात. पण करोनाच्या नियमांमुळे आधीच लॉकडाऊन असताना मनसेमुळे मुंबईतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दोन वर्षात म्हातारी मुलीला भेटली नाही’, मुलगी म्हातारीला भेटायला आली नाही – पाटलांचा सरकारला टोला!

News Desk

 ‘जनता प्रचंड अस्वस्थ आहे, चिडली आहे त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून लॉकडाऊनची भिती दाखवली जात आहे’, मनसेचा मुख्यमंत्र्यावर घणाघात

News Desk

…पण मी एकटा मुंबईला जाणार नाही, संभाजीराजेंची स्पष्ट भूमिका

News Desk