HW News Marathi
Covid-19

#CycloneNisarga : मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई | महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला आहे. हे चक्रीवादळ आज (३ जून) अलिबाग दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

मुंबईहून सुटणाऱ्या रेल्ले गाड्यांची बदललेली वेळपत्रकर बदलण्यात आली आहे. यात एलटीटी-गोरखपूर विशेष ट्रेन सकाळी ११.१० ऐवजी रात्री ८ वाजता सुटणार, एलटीटी-थिरुअनंतरपुरम विशेष ट्रेन सकाळी ११.४० ऐवजी संध्याकाळी ६ वाजता सुटणार, एलटीटी-दरभंगा विशेष ट्रेन दुपारी १२.१५ ऐवजी रात्री ८.३० वाजता सुटणार, एलटीटी-वाराणसी विशेष ट्रेन दुपारी १२.४० ऐवजी रात्री ९ वाजता सुटणार, सीएसएमटी-भुवनेश्वर विशेष ट्रेन दुपारी ३ ऐवजी रात्री ८ वाजता सुटणार, अशी माहिती मध्य रेल्वे त्यांच्या अधिकृत ट्वीटवरून ही माहिती दिली आहे.

रेल्वे उशिराने मुंबईत पोहोचणार गाड्यांचे वेगळापत्रक सकाळी ११.३० वाजता मुंबईला पोहोचणारी पाटणा-एलटीटी विशेष ट्रेन नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोणार आहे. आज दुपारी २.१५ वाजता मुंबईला पोहोचणारी वाराणसी-सीएसएमटी विशेष ट्रेन नियोजित वेळेपेक्षा उशिराने दाखल होईल. दुपारी ४.४० वाजता पोहोचणारी थिरुअनंतपुरम-एलटीटी स्पेशल ट्रेन पुण्याला वळवून एलटीटीला नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल!

News Desk

मुंबईत १५ जुलैपर्यंत संचारबंदी लागू 

News Desk

मराठी वाहिनीवरील या रिएलिटी शोमधील कलाकारांना कोरोनाची लागण

News Desk