HW News Marathi
महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या रोषाला घाबरून चंद्रकांत पाटील कोल्हापुरात थांबले नाहीत !

कोल्हापूर | “जिल्ह्यातील भीषण पूरस्थिती लक्षात घेता चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात असणे अपेक्षित होते. मात्र, कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या रोषाला घाबरून चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनाला कोल्हापूरमध्ये न येता पुण्यातच ध्वजारोहण केले”, अशी टीका काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली आहे. देशभरात गुरुवारी (१५ ऑगस्ट) देशाचा ७३ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या दिमाखात पार पडला. राज्यात भीषण पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये देखील स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मात्र, यावेळी महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित नव्हते.

“जिल्ह्यात निर्माण झालेली भीषण पूरस्थिती लक्षात घेता चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातच थांबणे आवश्यक होते. मात्र, ते कोल्हापुरातून बाहेर गेले. आपल्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल याच भीती चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनादिवशी कोल्हापूरला न येता पुण्यात ध्वजारोहण केले. मात्र, त्यांनी जर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसोबत मिळून यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा केला असता तर समाजात एक चांगला संदेश पोहोचला असता. मात्र, हा विचार न करता कोल्हापुरात न थांबता चंद्रकांत पाटील पुण्यात गेले हे दुर्दैवच”, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार!, राज्य शासनाचा निर्णय

News Desk

सेंच्युरी रेयॉनमध्ये विषारी गॅस गळती, कामगाराचा गुदमरुन मृत्यू, ११ जण गंभीर

swarit

शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट, केशव उपाध्येंची

swarit