HW News Marathi
महाराष्ट्र

कुणी चंपा म्हणतो, कुणी टरबूज्या म्हणतो हे खपवून घेतले जाणार नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई | भाजप कार्यकारणीच्या बैठकीचे काल (२७ जुलै) आयोजन केले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. कोणीही कोणावर चुकीचे स्टेटमेंट केले तर ते खपवून घ्यायचे नाही. कुणी चंपा म्हणतो, कुणी टरबूज्या म्हणतो हे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात एकमेकांवर टीका सोडणे, पलटवार करणे सुरूच असते, याच पार्श्वभमीवर त्यांनी हा सल्ला दिला.
चंद्रकांत पाटील असेही म्हणाले की, २ दिवस मी काहीही स्टेटमेंट केलं की विरोधकांना ते सहन झाले नाही. एका कार्यकर्त्याने कुत्रा म्हणणारी पोस्ट टाकली होती. मी त्याचा शोध घेऊन ती पोस्ट मागे घ्यायला सांगितली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन कमेंट केली तर ते खपवून घ्यायचे नाही, असे त्यांनी या बैठकीदरम्यान सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवावं, भाजपची मागणी

News Desk

पोलिस उप-अधीक्षक विशाल ढुमे पाटलांना कारने उडवण्याचा प्रयत्न

swarit

कुठेही चिखल करुन कमळ फुलवा, आता महाराष्ट्रात होऊ देणार नाही !

News Desk