HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रीय पातळीवर मनसेशी युतीबाबत चंद्रकांत पाटील काय म्हणतात ?

मुंबई | पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. मराठा समाजाच आरक्षण याच सरकरमुळे गेले. तसेच इमपीरिकल डाटा गोळा करण्याचा काम केले जात नाही असे म्हणत त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतही हेच होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. त्याचबरोबर पालघरमध्ये भाजप-मनसेची युती झाल्यानंतर राज्यात येणाऱ्या काळात भाजप मनसे युती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राज ठाकरे आणि माझी भेट ही अचानक झाली होती, त्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नव्हती. एखाद्या ठिकाणी आवश्यकतेनुसार युती होत असते, त्यामुळे पालघरमध्ये झालेली युती ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मर्यादीत आहे.

उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार

राष्ट्रीय पातळीवर युती व्हायला वरिष्ठ नेते चर्चा करतील असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार देगलूर-बिलोली मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ते येत्या 4 तारखेला देगलूरला जाणार आहे. एकूण १२ इच्छुकांची नावे समोर आली असून, मी त्याठीकाणी गेल्यावरत उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार अशी माहीतीही पाटील यांनी यावेळी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी…”, रुपाली चाकणकर कडाडल्या

News Desk

नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत द्या, काँग्रेस शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

News Desk

चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्याला ५० कोटी अतिरिक्त निधी देणार – अजित पवार

News Desk