HW News Marathi
महाराष्ट्र

“मनसेसोबत राज्य स्तरावर युती…” – चंद्रकांत पाटील

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होणार का याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे भाजपा मनसे युतीच्या चर्चेला आणखी वाव मिळाला. दरम्यान याबाबत चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, “युती ही स्थानिक ठिकाणच्या आवश्यकतेनुसार ठरत असते. मनसेसोबत राज्य स्तरावर, अखिल भारतीय स्तरावर युती ठरायला एक ऑथोरिटी असते. ती ऑथोरिटी याचा विचार करेल. पण एखाद्या जिल्ह्यात आवश्यकतेपोटी कोणाचीही कोणाशी युती होते. स्थानिक स्वराज्य संस्थांना काहीही बंधन नसतात. अनेक ठिकाणी भूतकाळात भाजपा-राष्ट्रवादी युती झालेली आहे. पालघर जिल्ह्यात झालेली युती स्थानिक आवश्यकता असेल म्हणून झाली याचा अर्थ हा आता कॉमन पॅटन झाला असे नाही.”

माझी आणि राज ठाकरे यांची भेट अचानक झाली

पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांसाठी भाजपा-मनसे एकत्र आल्याचं चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागांसंदर्भात महत्वाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती आहे. तर, इतर ठीकाणी विशेषता मुंबईमध्ये मनसे भाजपा एकत्र येणार का? यावर बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले, “हा कॉमन विषय नाही. माझी आणि राज ठाकरे यांची भेट अचानक झाली. नाशिकमध्ये अचानक आम्ही ऐकमेकांच्या समोर आलो. जसे दोन हिंदू मानस चहासाठी भेटतात त्याप्रमाणे मी राज ठाकरेंना भेटलो. याचा मनसे आणि भाजपा युती होण्याचा काहीही सबंध नसतो.”

पालघर जिल्ह्यातील १५ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारच्या अखेरच्या दिवसानंतर जिल्ह्यतील १४४ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होत असून बहुतेक उमेदवारांची प्रचाराची पहिली फेरी संपली आहे. कपील पाटील यांनी सोमवारी रात्री उशीरा पत्रकारांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या या सर्वांना भारतरत्न द्यावा लागेल ।सचिन सावंत

swarit

पूरग्रस्तांना मदत की फक्त जाहीरातबाजी ?

News Desk

“बाकी सगळं स्मरणात येतं मग आमदारांच्या यादीचं विस्मरण होतं?”, राऊतांचा राज्यपालांना चिमटा

News Desk