HW News Marathi
महाराष्ट्र

भुजबळांना राज्य सरकारविरोधात भडकवण्याचा चंद्रकांत पाटलांचा प्रयत्न ?

मुंबई | ओबीसी समाजासाठी भाजपने १२ आमदारांचा त्याग केला आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करुन घेतली. महाराष्ट्रात १ हजार ठिकाणी अटक करुन घेतली आहे. भुजबळ यांनी त्यांच्या सरकारविरोधात संघर्ष केला पाहिजे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपकडून ओबीसी जागर अभियान करण्यात येत असल्याचे भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं आहे.

ओबीसीचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले

आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी जो संघर्ष सुरु आहे त्यात लोकांपर्यंत नीट पोहोचवण्यासाठी ओबीसी जागर अभियान करायचे आहे. ओबीसी राजकीय आरक्षणामध्ये अल्पसंख्यांक मंत्री छगन भुजबळ, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर खोटं प्रस्थापित करुन समाजाची दिशाभूल करत आहेत. मराठा आरक्षण देण्याचे भाजपने धाडस केलं आहे. त्यावेळी मराठा आरक्षण तर देऊ परंतु ते देताना ओबीसी आरक्षणाला हात लावणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ते व्यवहारात आणलं वेगळ एसईबीसी आरक्षण दिले. ते आरक्षण हायकोर्टात, सर्वोच्च न्यायालयात टिकवले परंतू या नाकर्ते राज्य सरकारला ते टिकवता आले नाही. असा घणाघाती आरोप त्यांनी राज्यसरकारवार केला.

त्यामुळे ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपच्या मनामध्ये खोट असेल तर मराठ्यांना खुश करण्यासाठी हे म्हणता आले असते की, मराठा समाज ओबीसी केला की, त्यांना ओबीसी आरक्षणात जोडू कुन्बींच्या बरोबर, पण ३२ टक्के मराठा समाज आहे जर हा समाज ओबीसीमध्ये आला असता त्याचे काय परिणाम झाला असता हे सगळ्यांना माहिती आहे. ओबीसी समाजाबाबत भाजपच्या मनात खोट नाही तर त्यांच्याबाबत प्रेम, श्रद्धा आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, जर भुजबळ यांचे म्हणणे खरे आहे की, केंद्रान इम्पेरिकल डेटा द्यावा तर ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कशाला गेले होते. ते फडणवीस यांना भेटायला गेले तेव्हा म्हणाले की, आम्हाला पटतंय की ही राज्याची जबाबदारी आहे तर कसे कसे करुया संगा असे भुबळ यांनी फडणवीसांना विचारले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे ओबीसी समाजाला परंपरागत उद्योगातून वर काढायचा असेल तर त्याला इतर समाजाला न्याय देताना या समाजावर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली आहे. असेदेखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अ कृषी जमिनीसाठीची अट शिथिल

News Desk

आपण कांदा निर्यातबंदी केली तर पाकिस्तानला त्याचा फायदा होईल, रोहित पवारांचा इशारा

News Desk

मुंबईत अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या नागरिकांच्या तक्रारी

News Desk