HW News Marathi
महाराष्ट्र

राम जन्मभूमीच्या संघर्षातील नेत्यांवरील ठपका पुसला गेला!

मुंबई | बाबरी मशीद प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा आज (३० सप्टेंबर) तब्बल २८ वर्षांनी निकाल लागला. बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. बाबरी घटना पूर्वनियोजित नव्हती, ती अचानक घडली, असे मत कोर्टाने मांडले आहे. त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.

“राम जन्मभूमीच्या संघर्षात अनेक मोठ्या नेत्यांवर कारण नसताना ठपका ठेवला होता. हा ठपका पुसला गेला. याचा आम्हाला आनंद आहे. हा न्यायाचा विजय आहे”, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. तसेच,“भाजप नेहमीच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. राम जन्मभूमीचे निर्माण आणि आजचा निकाल हे दोन अतिशय महत्वाचे निर्णय आहेत. लाखो कारसेवकांच्या मनात शतकानूशतके राग होता तो व्यक्त केला. त्या उत्स्फूर्त भावनेमध्ये बाबरी पडली. या लाखो लोकांवर खटले दाखल करणार का?”, असा प्रश्नही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे. तसेच, “ओवेसी यांची प्रतिक्रिया चुकीची आहे. उत्स्फुर्त भावनेने व्यक्त झालेल्या लोकांनी हिंसा केली असं म्हणता येणार नाही. हा हिंदूंचा अपमान ठरेल”, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले ओवीसी?

बाबरी मशीद प्रकरणात लखनऊतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (३० सप्टेंबर) निकाल दिला आहे.या प्रकरणात ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच,बाबरी मशीद पाडण्याची घटना हा पूर्वनियोजित कट नव्हता, असे निरीक्षण देखील नोंदवले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर AIMIMचे नेते ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जर मशीद ३२ जणांनी पाडली नाही, तर कुणी पाडली?, असा सवाल ओवेसी उपस्थित केला आहे.सीबीआय न्यायालयानं दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ६ डिसेंबरला बाबरी मशीद जादूनं पाडण्यात आली होती का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC मधील प्रभाग रचनेतील बदललेल्या नकाशाबाबत भाजप नेत्याचा आक्षेप

Aprna

“आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?”, काँग्रेसचा सायकलवरून विधानभवनात प्रवेश

News Desk

शिक्षकाने केला पत्नीचा खून

News Desk