HW News Marathi
महाराष्ट्र

राबडीदेवी शिवी नाही; चंद्रकांत पाटलांकडून जितेन गजारियांच्या वक्तव्याचं समर्थन

मुंबई | भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमध्ये गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’ असं म्हटलं होतं. त्यानंतर गजारियावर गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते शिवसेनवर टीका करताना दिसत आहेत. अशातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता याप्रकरणी प्रतिक्रिया देत गजारियांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. राबडीदेवी ही शिवी नाही, असं पाटलांनी म्हंटलंय. तसेच ‘रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हटलेय, फूलन देवी नाही’, असा टोमणाही त्यांनी मारला आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारचं म्हणजे माझा तो बळवंतराव आणि दुसऱ्यांचा तो बाब्या, असं चाललंय. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी महिलांबद्दल काहीही बोललेलं चालतं, देशाच्या पंतप्रधानांवर टीका केलेली सुद्धा चालते. मात्र, भाजपामधील मंत्र्यांनी एक शब्द जरी बोलला तरी त्यांच्यावर कारवाई होते. भाजपच्या जितेन गजारियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली होती. यात गैर काहीच नाही. त्यांना फूलन देवी म्हटलं नव्हतं. पण तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, राबडीदेवी ही काय शिवी नाही”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी गजारियांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

रश्मी ठाकरेंना फूलनदेवी म्हटलेलं नाही

लालूप्रसाद यादव यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी राबडीदेवी या बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे रश्मी ठाकरे या देखील राबडीदेवींप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची धूरा सांभाळू शकतात, म्हणून गजारियांनी रश्मी ठाकरेंना राबडी देवी म्हंटलं होतं. त्यांनी केवळ उपमा दिली, फूलनदेवी म्हटलेलं नाही. त्यामुळे यात वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही, असं पाटील म्हणाले. तसेच या प्रकरणी गजरिया यांना आम्ही समज दिली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते अनेक ठिकाणी, अनेक बैठकींना उपस्थित राहिले नव्हते. त्यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवावा असा सल्ला चंद्रकांत पाटीलांनी दिला होता. तर अब्दुल सत्तार यांनी देखील मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करत रश्मी ठाकरे या उत्तम प्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, असं वक्तव्य केले होते. रश्मी ठाकरे या पदड्याच्या मागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे आलेल्या नाहीत. पण, त्या उद्धव ठाकरेंच्या सोबत असतात त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बर्‍यापैकी माहिती आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर नाही तर मुंबईतच होणार!

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

swarit

भावना गवळींना वर्षावर नो एंट्री, मुख्यमंत्र्यांची अर्धा तास वाट बघून भेटीशिवायच परतल्या!

News Desk