HW News Marathi
महाराष्ट्र

‘राज ठाकरेंच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलांचा दुजोरा!’

पुणे। मनसे आणि भाजपच्या युतीबद्दल राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला आहे. ओबीसी आरक्षणाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव आहे, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. तुम्ही त्यांच्या म्हणण्याचा वेगळा अर्थ का काढता?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तुम्ही लगेच वेगळा अर्थ काढता

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी दुजोरा दिल्यावर त्यांनी मिश्किल टोला देखील लगावला आहे. राज ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे. तुम्ही लगेच वेगळा अर्थ काढता. ओबीसी आरक्षणावर एक महिन्यात निर्णय येऊ शकतो. ओबीसींच शिक्षणातलं आरक्षण गेलं नाही. राजकीय आरक्षण गेलंय. राज ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे, कारण त्यांना आरक्षणाच्या नावाखाली निवडणूका पुढे ढकलायच्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूका हरणार म्हणून ते निवडणूका पुढे ढकलत आहेत. राज ठाकरे आता बोलायला लागलेत. अण्णा हजारे बोलायला लागले आहेत. अशा ताकदी रस्त्यावर उतरल्याशिवाय याचा खोटारडेपणा बाहेर येणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल

राज ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारची कान उघडणी केली आहे. “ओबीसी राजकीय आरक्षण बाबत सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, निश्चित स्थगिती दिली पाहिजे. पण त्यामुळे हे काम पटकन होणार असेल तर याला स्थगिती मला मान्य आहे. निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवं. सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत. मला असं वाटतं की पुढे असं नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडीने सत्तेचा पुरेपूर वापर केला, तरीही…पाटलांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत! – नाना पटोले

Aprna

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे निधन

News Desk