HW News Marathi
महाराष्ट्र

“महाविकास आघाडी सरकार भूईसपाट होईल”

रायगड | महाविकासआघाडी सरकारवर विरोधी पक्ष कायमच टीका करत असतं. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा मुंबईनंतर आता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या यात्रेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांची प्रमुख उपस्थिती आहे.तर चंद्रकांत पाटील आणि सुनिल देवधर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

यापुढे जिथे जिथे निवडणुका होतील, तिथे सत्ताधारी भूईसपाट होतील

चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर टिएक्स्त्र सोडलं आहे. “जन आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर लोक खूश आहेत. पंढरपूर आणि साडे सहा हजार गावांमध्ये सत्ताधारी पराभूत झाले. आता यापुढे जिथे जिथे निवडणुका होतील, तिथे भूईसपाट होतील. या यात्रेतील प्रतिसादावरून दिसतंय.”, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

“जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. नारायण राणे यांच्याबद्दल लोकांमध्ये आजही तितकंच प्रेम आहे. नारायण राणेंच्या यात्रेला लोकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळेच सरकार आमच्यावर गुन्हे दाखल करत आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरे घाबरल्याचं दिसत आहे.”, असं भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी सांगितलं आहे.

तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा, असा हल्लाबोल राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला. हे सरकार आहे तरी कुठे, जनतेने या राज्यात भाजपचं सरकार यावं, मुंबई महापालिका आम्ही जिंकावी, मुंबई जगातील सुंदर, पर्यटन, आरोग्यदायी शहर बनवण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे, अशी जनतेची भावना आहे. शिवसेनेचा आशिर्वाद आम्हाला नको, महागात पडेल, त्यांचा रोखीचा आशिर्वाद असतो, अशी खिल्ली नारायण राणे यांनी उडवली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजगृहावर झालेल्या तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी केले शांततेचे आवाहन

News Desk

आपल्या नावातील “अ” मृतावस्थेत जावू देवू नका, शिवसेनेकडून अमृता फडणवीसांना सणसणीत उत्तर

swarit

मराठवाड्याला केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा संजय राऊत यांची मागणी!

News Desk