HW News Marathi
महाराष्ट्र

‘आधी आंदोलनं करा मग सरकार काम करणार’, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला खोचक टोला

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज(१० ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली होती. चंद्रकांत पाटलांनी या सभेत विरोधी पक्षावर निशाणा साधून त्यांना धारेवर धरलं आहे. ” महाविकासआघाडीला जो पर्यंत लोकं आंदोलनं करत नाहीत आणि रस्त्यावर उतरत नाहीत तो पर्यंत हालचाल करतं येत नाही. लोकलच्या बाबतीत देखील तेच करण्यात आलं आहे. भाजप पक्षाने आंदोलन केल्यावर सरकारचे डोळे उघडले आणि त्यांनी लोकल सुरु संबंधित निर्णय दिला आहे”, असा टोला राज्य सरकारला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावंच लागेल

मंत्रालयात आज(१० ऑगस्ट) दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. यावरून आता विरोधी पक्षाने राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. भाजप नेत्यांनी या विषयावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ” मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडणं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीत लक्ष घातला पाहिजे आणि त्यांना उत्तरही द्यावं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात कोणाला परवानगी नसताना मंत्रालयात बाटल्या आल्या कश्या? यावरून आपल्या कल्चरवर परिणाम होतो”, असं मत चंद्रकांत पाटलांनी दिलं आहे.

बायकोला मारणं बंद केलं का?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा रंगात होती. त्या अजूनही नाराज आहेत का असा प्रश्न विचारता, ” मी माझ्या बायकोला मारणं बंद केलं का? असं सवाल झाला. पंकजा मुंडे नाराज न्हवत्याच, उत्तर हो किंवा नाही मध्ये असतं तर तुम्ही एकाच अर्थ काढला असता. पंकजा मुंडे कधीच नाराज न्हवत्या आणि पक्षात देखील मतभेद नाहीत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दिल्लीला जाण्याचं कारण काय?

भाजप नेत्यांची दिल्लीत भेट झाली असून या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. चंद्रकांत पाटलांनी या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे. ” भाजपची ही प्रथा आहे की सगळे खासदार एका मोठ्या खासदाराच्या घरी जाऊन भेटून महाराष्ट्रातल्या घडामोडींचा आढावा घेतात. या भेटीमागचं कारण राजकीय न्हवतं. भाजप नेत्यांनी केंद्रात निवड झालेल्या सगळ्या नेत्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं कौतुक देखील केलं.”

” दिल्लीत ज्या नेत्यांची निवड झाली आहे, त्यांचा फायदा महाराष्ट्रातल्या कोणत्या कामांसाठी करतं येईल यावर देखील चर्चा झाली आहे. नवीन मंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या २ वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या भेटी होऊ शकल्या न्हवत्या परंतु आता पुन्हा या भेटी चालू होतील”, अशी माहित चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

मोदी- शाह भेटले नाही कारण….

“दिल्लीत भाजपच्या सगळ्या नेत्यांशी भेट झाली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट होऊ शकली नाही कारण त्यांच्याशी काही काम न्हवतं. या भेटी १५ दिवस आधीच ठरल्या होत्या आणि त्या संबंधात पत्रं देखील दिल्लीला गेली होती. ही भेट राजकीय नसून नवीन मंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी होती, या सगळ्यात मोदी आणि शाहंचं काही काम नसल्याने त्यांची भेट घेतली गेली नाही”, चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण. राज ठाकरेंच्या भेटीमुळे पक्षातले नाराज आहेत असं विचारला असता, ” जर माझ्यावर पक्षातले नाराज असते तर त्यांची आणि माझी भेट झालीच नसती, ते माझ्यावर नाराज नाही म्हणून आम्ही व्यवस्थित भेटलो आणि शुभेच्छा दिल्या आहते”, चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई शहर जिल्ह्याच्या २४० कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

News Desk

‘ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार’, नाना पटोलेंचा थेट हल्ला

News Desk

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा अक्रियाशील सदस्याची तरतूद रद्द

News Desk