HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्र्यांनी तुटपुंजी तरतूद करुन जनतेच्या तोंडाला पाने पुसली”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१३ एप्रिल) राज्यातील जनतेशी संवाद साधताना १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही संचारबंदी जाहीर करत असल्याचं सांगत त्यांनी सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि मदतीची माहिती दिली आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत,” असं ते म्हणाले आहेत.

“राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले, पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रतीकुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात प्रतीकुटुंब १०५ रुपयांचाच भार सोसलेला आहे”.

“रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई-पुण्याच्या पुढे महाराष्ट्र आहे अशी आठवण मुख्यमंत्र्यांना करुन दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवनिर्वाचित मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी घेतली अमित शाह यांची भेट

Chetan Kirdat

‘तेजस ठाकरे जीवसृष्टी सोडून राजकारणात येईल असं वाटत नाही’, छगन भुजबळांचं भाष्य!

News Desk

पहिले कोरोना टेस्ट किट जन्माला घातले आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला…

swarit