HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री गेंड्याच्या कातडीचे आहेत कारण यशोमती ठाकूरांनी जर… चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

तिवसा | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. यशोमती ठाकूर यांना जर नैतिकता नाही नीतीमत्ता नाही तर अशावेळी राजीनामा द्यायचा असतो, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

तसेच, ज्यावेळी सगळं काही नीट होतं तेव्हा मंत्री मंडळात परत यायचं असतं, असेही पाटील म्हणाले आहेत. पुढे ते असेही म्हणाले की, मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना सत्तेची पडली आहे. त्यांना माहित आहे की यशोमती ठाकूर यांनी राजीनामा दिला तर कॉंग्रेस पाठींबा काढून घेईल. ते गेंड्याच्या कातडीचे आहेत, असेही मुख्यमंत्र्यांना ते म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.

अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. यशोमती ठाकूर यांना 15 ऑक्टोबरला तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून मी स्वत: मुख्यमंत्र्यांचे थकलेले पाणी बिल भरणार !

News Desk

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक

News Desk

बीएमसीच्या प्रभागात वाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

News Desk