HW News Marathi
महाराष्ट्र

‘काही लोकांच्या मनातील रोगही दूर कर’, छगन भुजबळांचं गणरायाकडे साकडं

मुंबई | अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना काल(९ सप्टेंबर) कथित महाराष्ट्र सदन प्रकरणात निर्दोष मुक्तता मिळाली आहे. देशात आज(१० सप्टेंबर) गणेशोत्सव साजरा केला जात आहे, आणि छगन भुजबळ यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालं आहे. यावेळी त्यांनी राज्यावरील कोरोनाचं संकट दूर कर आणि काही लोकांच्या मनातील द्वेषाचा रोगही दूर कर, असे साकडे बाप्पाला घातले. यावेळी भुजबळांनी अंजिरवाडीतील बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला.

पहिल्यांदा कोरोना दूर करा

छगन भुजबळ यांनी गणरायाकडे कोरोना दूर करण्याचं साकडं घातलं आहे. पहिल्यांदा कोरोना दूर करा. कोरोना दूर झाल्यानंतर काही लोकांच्या मनातील रोग दूर करा. सर्वांना निरोगी करा, शारीरिक आणि मानसिकृष्ट्याही. कोरोनाचा दूर करावा तसे मनामनातले रोगही दूर करावेत असं साकडं मी गणरायांना घातलं आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

नियती आशीर्वाद देते ती जनतेच्या माध्यमातूनच

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गणपतीही आशीर्वाद देतात आणि नियती आशीर्वाद देते ती जनतेच्या माध्यमातूनच देते. नियतीने आशीर्वाद दिला. त्यामुळे मला न्याय मिळत चालला आहे. आणखीही न्याय मिळेल. दोन प्रकरणात न्याय मिळाला. महाराष्ट्र सदन हे बेसिक आहे. बाकीच्या केसेस या त्याच पायावर उभ्या आहेत. इकडून तिकडून या केसेस तयार केल्या आहेत. आता न्यायदेवतेलाही माहीत झाले आहे. काय आहे आणि काय नाही. त्यामुळे आम्हाला आनंद आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळत आहे, असं ते म्हणाले आहेत.

ईडी हा केंद्र सरकारचा दुसरा पपेट

मागे सर्वोच्च न्यायालय म्हणाले होते की, सीबीआय हा पपेट आहे. आता ईडी हा केंद्र सरकारचा दुसरा पपेट आहे. ईडीचा एवढा दुरुपयोग कधीही झाला नव्हता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही तेच सांगितलं. शिवसेनेच्या स्थापनापासून मी राजकारणात आहे. कधी यांचं तर कधी त्यांचं सरकार आलं. वाजपेयींचंही सरकार आलं. पण अशी वागणूक कधीच दिली गेली नाही. जिथे जिथे विरोधी पक्षांचं सरकार आहे, विरोधक प्रबळ आहेत. तिथे या सर्वांना त्रास सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

काय होतं प्रकरण?

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ताच्या आरोपावरुन दोन वर्षापासून छगन भुजबळ हे तुरुंगवासाची शिक्षा भोगत होते. ४ मे रोजी भुजबळ यांना ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) भुजबळ यांच्यासह पंकज, समीर आणि अन्य १४ जणांवर आधीच आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची चौकशी पुढे नेत, भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सरकारी तिजोरीचे ८७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे ‘ईडी’ने म्हटले होते आणि छगन भुजबळ यांना अटक केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी सरकारची ताकद उभी करु! | नाना पटोले

News Desk

शरद पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग आहे! – महेश तपासे

News Desk

समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचा संबंध काय?- नवाब मलिक

News Desk