HW News Marathi
महाराष्ट्र

‘भाजपमधून बाहेर पडाल तर काय त्रास होतो हे दाखवायचं आहे’, भुजबळांचा भाजपवर वार

नाशिक | राजकारण म्हटलं कि वादविवाद, टीका हे येतंच. त्यात महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षमध्ये नेहमीच वाडवडील निर्माण असतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर आता एकनाथ खडसे यांची गेल्या ५ तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे.दरम्यान, खडसे यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे सुद्धा या सगळ्यामध्ये कुठे पाठी नाहीत.

भाजपमधून बाहेर पडाल तर काय त्रास होतो हे त्यांना दाखवायचं

कट्टर शिवसैनिक ते काँग्रेस अशी राजकीय कारकीर्द असलेले नारायण राणे आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा भाग बनले आहेत. त्यांच्या या मंत्रिपदावरून विरोधी पक्षाकडून अनेक टीकात्मक वक्तव्य येत आहेत. ‘भाजपमधून बाहेर पडाल तर काय त्रास होतो हे त्यांना दाखवायचं’ असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केलीय.’

छगन भुजबळांचा भाजपला इशारा

अन्य पक्षात असलेल्या लोकांना भास देऊन तो आपल्या पक्षात आला की त्याचे सगळे गुन्हे माफ केले जातात. खडसे आणि आम्ही सगळे जण त्यांना निश्चितपणे उत्तर देऊ, असा इशाराही भुजबळ यांनी दिलाय. भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालेल्या संधीबाबत विचारलं असता कोरोना काळात आरोग्य खात्यासारखं महत्वाचं खातं त्यांना मिळालं आहे, त्याचा नक्कीच फायदा होईल, असं भुजबळ म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचलं

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात असल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं आहे. नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच नारायण राणेंसमोर महाराष्ट्र आणि देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचं तसंच करोना काळात कोलमडलेल्या उद्योगांना संजीवनी देण्याचं आव्हान असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांच्या घरी सीबीआय पथक तर अडचणीत पुन्हा वाढ!

News Desk

“राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा!

News Desk

मोदी सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारून उद्योगपती मित्रांचा फायदा करून देत आहेत – नाना पटोले

News Desk