HW News Marathi
देश / विदेश

अनिल देशमुखांसह मुख्यमंत्र्यांनीही तातडीने राजीनामा द्यावा ! । नारायण राणे

मुंबई । ठाकरे सरकारला महाराष्ट्र भाजपने चांगलेच कोंडीत पकडले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे जोर धरत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे ठाकरे सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. परमबीरसिंग यांनी या पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणावरुन आता भाजप खासदार नारायण राणे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे. ते ‘Tv9 मराठी’शी बोलत होते.

राज्यात सुरू असलेल्या खळबळजनक स्थितीमुळे राजकीय स्थितीवर बोलत मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना नारायण राणे म्हणाले, “सचिन वाझे यांना मर्डर केसमध्ये वाचवण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली होती. मग मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मिळताच अनिल देशमुखांवर कारवाई का केली गेली नाही? मुख्यमंत्र्यांनी त्यांना का निलंबित केले नाही? मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, याचा अर्थ असा होतो की १०० कोटी खंडणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही संबंध आहे. त्याचप्रमाणे, वाझेंना वाचवायचेही काम मुख्यमंत्री करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा सर्व घटनांशी थेट संबंध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा”, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी !

नारायण राणे पुढे बोलताना म्हणतात की, “महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढतो आहे. राज्यत कायदा आणि सुव्यवस्था नाही. विकास ठप्प आहे आणि पोलीसच गुन्हे करु लागले आहेत. त्यामुळे राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमधील १२ पोलीस झाले दहशतवादयांना सामील

News Desk

लखीमपूर हिंसाचार प्रकरण : मुख्य आरोपी आशिष मिश्राच्या पोलीस कोठडीत ३ दिवसांची वाढ

News Desk

संजय राऊत-आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा ! भाजप नेत्याची सीबीआयकडे मागणी

News Desk