HW News Marathi
महाराष्ट्र

शिंद-फडणवीस सरकारची मोठी घोषणा! प्रतिलिटर पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त

मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. यानंतर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज (14 जुलै) पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिंदे सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करता मोठी कपात करण्याची मोठी घोषणा केली आहे. यानुसार, पेट्रोलचे दर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 3 रुपयांनी दरात कापात केली आहे. शिंदे सरकारच्या निर्णयामुळे सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.

मुख्यमंत्री म्हणाले, “आज मंत्रिमंडळाची बैठक झाली यात अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर निर्णय झाले. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की शासनानी लोकाहितासाठी काही निर्णय घेतले आहे. याआधी आम्ही तुम्हाला सांगितले की, आमचे शासन हे सर्वसामान्यांना दिलासा देणारे शासन आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम शासन पुढील काळात टप्प्याटप्प्याने करणार आहे. याची सुरुवात आम्ही मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीतून केलेली आहे. मला आज या ठिकाणी आनंदी आणि समाधानी वाटते की, मी उपमुख्यमंत्र्यासोबत चर्चा केल्यानंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे जे दर हे जागतिक बाजारपेठेतील दरावर अवलंबून आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत्याने वाढ होत असेत.”

 शिंदे सरकारचा पहिला निर्णय! पेट्रोल 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये 

“देशभरात आणि राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होते. यामुळे केंद्र सरकारने देखील 4 नोव्हेंबर 2021 आणि 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या करामध्ये कपात केल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. यानंतर पंतप्रधानांनी देखील राज्य सरकारला करामध्ये कपात करण्याचे आवाहन केले होते. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली तर सर्व सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. काही राज्यांनी पंतप्रधानांच्या आवाहानानंतर पेट्रोल-डिझेलवरील करातमध्ये कपात केली होती. परंतु, आपल्या राज्य सरकारने ते कमी केले नव्हते. यानंतर आम्ही युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ठरविले की, ज्या माध्यमातून आपली आर्थिक परिस्थिती लक्ष्यात घेऊन जनतेच्या हिताचे एक एक निर्णय घेतले पाहिजे. यामुळे आज आम्ही पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये अशा प्रकरे दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे जवळ 6 हजार कोटी रुपयाचा भार शासनाच्या तिजोरीवर पडेल. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयाने जनतेला दिलासा मिळेल. हा एक महत्वाचा निर्णय मंत्रिमडळाने घेतला आहे,” मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत केली मोठी घोषणा करताना म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फक्त अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी ईडीकडून अविनाश भोसलेंवर कारवाई?” – अंजली दमानिया

News Desk

‘आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आलात तर सोडत नाही’, देवेंद्र फडणवीस

News Desk

शरद पवारांच्या भेटीनंतर गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चेला उधाण

Manasi Devkar