HW News Marathi
महाराष्ट्र

सण-वार काही काळ बाजूला ठेवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं गोविंदा पथकांना आवाहन!

मुंबई। दहीहंडी साजरा करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका दहीहंडी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विरोधी पक्ष भाजपने घेतली. त्यावर जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली.

दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील

सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजे, पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील किंबहुना दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला.

गोविंदा पथकांच्या मुख्यमंत्र्यांकडे मागण्या

१) आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी.

२) दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे.

३) गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत.

४) कोविड १९ संसर्गाची जाणिव ठेवुनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी.

५) दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.

दुसऱ्या लाटेत डाँक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय…

आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही आहोत. नीती आयोगाने जे सांगितलंय, ते लक्षात घेतलं पाहीजे गेल्या दीड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवलीय ती इतर कोणत्याही राज्याने वाढवलेली नाहीये.आपण दूसर्या लाटेत डाँक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलो आता जी विंडो आपल्याला मिळालीय, तीचा वापर आपण थोडं अर्थ चक्र सावरण्यासाठी करूयात. पुन्हा ती काळरात्र नको, जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ समजूतीने घ्याव्या लागतील. गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ

बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे… गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत… त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावी, लस घेतल्यावर देखील काही देशात लाँकडाऊन करण्यात आलंय… इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केलीय… अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे… कारण अनेकांची हातावर पोट आहेत.. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलांय… आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडीडी रहिवाशांना स्टॅम्प ड्यूटी फक्त आता 1 हजार रुपये राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

News Desk

कंगना रणावतचे ट्विटर हँडल सस्पेंड, बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर केली कारवाई

News Desk

शरद पवार पुन्हा रुग्णालयात, महिनाभरात ३ शस्त्रक्रिया

News Desk