HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली, पत्र लिहिलं पण…”,राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी

मुंबई।केंद्रीय कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन सुरूये (२८जूनला) आंदोलनाला सात महिने पूर्ण झाली, कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार केव्हाही तयार आहे असं वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलंय. यावर आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.जोपर्यंत शेतकरी कायदे परत घेतले जात नाही तोपर्यंत शेतकरी घरी जाणार नाहीत असा इशारा त्यांनी आता सरकारला दिलाय.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी दर्शवली तर केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेईल असे एकंदरीत वाटत नाही, म्हणून हे आंदोलन २०२४ च्या निवडणुकांपर्यंत चालेल आणि निवडणुकांमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण करू असा इशारा राकेश टीकैत यांनी केंद्र सरकारला दिलाय.

केंद्राच्या नव्या शेती कायद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली पत्रव्यवहार केला मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतही उत्तर मला मिळालेल नाही, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी दर्शवली आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुणालाही भेटलेले नाहीत मंत्रिमंडळातील सदस्य आणि सनदी अधिकारी यांच्याशिवाय मुख्यमंत्री कुणालाही भेट देत नाही मात्र राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलीये.

अजित पवार काय म्हणाले?

केंद्र सरकारची कृषी सुधारणा विधेयके शेतकऱ्यांना फायद्याची वाटत नाहीत . विविध शेतकरी संघटनांसह अनेक राजकीय पक्षांनी या विधेयकांना विरोध केला आहे . तरीही ही विधेयके लागू करण्यासाठी एवढी घाई करण्याचे कारण काय , ‘ असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रश्नावर विचारल होत तसेच कृषी सुधारणा व कामगार विधेयकांची अंमलबजावणी राज्यात होऊ नये , असा आमचा प्रयत्न राहील अशी भूमिकाही त्यांनी यापूर्वीच मांडली आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तळीयेत अजूनही लोकं बेपत्ता, शोधकार्य सुरूच’, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती….!

News Desk

नियमित परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देणार! – मुख्यमंत्री

Aprna

मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही, अशोक चव्हाणांनी व्यक्त केली नाराजी

News Desk