HW News Marathi
महाराष्ट्र

घोषणाबाजी न करता केलेल्या विकासकामाचे केले लोकार्पण; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुंबई | “घोषणाबाजी न करता केलेल्या विकासकामाचे लोकार्पण केले,” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. ही गती प्रगतीची आहे की अधोगतीची ?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. मार्गदर्शन करणे हा राजकारण्यांचा आवडता छंद आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. मुख्यमंत्री आज (४ एप्रिल) पर्यायी इंधन परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले आहेत. 

 मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या 2– अ या दहिसर ते डहाणूकरवाडी मार्गावरील आणि मेट्रो 7 दहिसर ते आरे या दोन मार्गिकांवरील मेट्रो गुढीपाडव्याच्या दिवशी लोकार्पण केले. त्यापूर्वी मेट्रोच्या श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले होते. यावेळी भाजपने मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असून ‘काम केलंय मुंबईने पाहिलंय’ असं लिहिण्यात आलं आहे. भाजप-शिवसेना काळात सुरू झाले होते. मेट्रोच्या कामाला भाजपने गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेले, असा दावा भाजपकडून करण्यात येतो. घोषणाबाजी न करता केलेल्या विकासकामाचे लोकार्पण केले, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आज पर्यायी इंधन परिषदेत भाजपला टोला लगावल

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा विचार करतो, असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले.अद्याप कोरोना धोका गेलेला नाही. बंधनमुक्त आयुष्य आपण पुन्हा सुरू करतोय  प्रदूषण पण एकप्रकारचा विषाणू आहे. पर्यावरणाची हानी होऊ न देता विकास व्हायला हवा, असे पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश त्यांनी केला. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानमध्ये कधी बॉम्ब फोडणार याची वाट बघतोय, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

News Desk

शिवशाहीच्या तिकीट दरांमध्ये कपात, १३ फेब्रुवारीपासून नवे दर लागू

News Desk

बॉलिवूडला संपवण्याचा प्रयत्न केला तर… मुख्यमंत्र्यांचा इशारा

News Desk