HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांचे महत्व माझ्यापेक्षा जास्त विरोधकांना माहिती; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

मुंबई | राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, त्यांचे महत्व माझ्यापेक्षा जास्त विरोधकांना माहिती आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (२५ मार्च) शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतून भाजपवर खडेबलो सुनावले आहे.

सभागृहात मुख्यमंत्री म्हणाले, ” राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, त्यांचे महत्व माझ्यापेक्षा जास्त विरोधकांना माहिती आहे. विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे जातात. राज्यपाल महोदय नेमके काय बोलतात हे किमान ऐकून घेतले पाहिजे. राज्यपालांचे भाषण ऐकले नाही, तर मग समाजसुधारकांचे अनुकरण काम कसे करणार?

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

– पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावणपूरक इलेक्ट्रिकल बस परवणार

– आम्ही कमीत कमी पर्यावरणाची हानी करून प्रकल्प उभारणार

– सर्वांना घरे मिळावी म्हणून धोरणात्मक निर्णय

– केंद्रात सत्ता मिळाली तरी मुंबईत जीव असतो

– मी जन्माने मुंबईकर, मला मुंबईचा अभिमान आणि 

– रावणाचा जीव जसा बेबींत तसा काही लोकांचा जीव मुंबईत आहे

– काही ठिकाणी नदीत मृतदेह सापडेल तर आम्ही काही करत नाही

– ज्मोबो कोविड सेंटर उभारण्याची सुरुवात मुंबईतून झाली

– उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्यविक्रीची दुकाने आहेत

– वाईन सुपर मार्केटमध्ये मिळणार, किराणा दुकानात नाही

– कोरोना काळात महाविकासआघाडी सरकार उत्तम काम केले

– विरोधक हक्काने तक्रारी करण्यासाठी राज्यपालांकडे जातात

– राज्यपाला राज्याच्या प्रगतीचा आढावा घेतील असे वाटले होते. परंतु, ते राष्ट्रगीतला देखील थांबले नाही

– काही लोकांना आरशात पाहिले तर भष्ट्राचार झाला असे वाटते

– महाराष्ट्राला पुरस्कार मिळाल्याचे राज्यपालांनी कौतुक केले.

– स्कॉटलँड येथे झालेल्या हवामान परिषदेते महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला

– कोरोना काळात रात्रंदिवस राज्याची यंत्रणा काम करत राहिली, याचा अभिमान

– विदांच्या कवितेप्रमाणे देवेंद्रजी तुम्हीही तेच ते करत राहिला दाऊद एक दाऊद

– राज्यपालांचे भाषण ऐकले नाही, तर मग समाजसुधारकांचे अनुकरण काम कसे करणार?

– राज्यपाल महोदय नेमके काय बोलतात हे किमान ऐकून घेतले पाहिजे

– विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे जातात 

– राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, त्यांचे महत्व माझ्यापेक्षा जास्त विरोधकांना माहिती आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात कायदा टिकवला – आशिष शेलार

News Desk

बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

मी प्रामाणिकपणे निवडणूक लढवली, माझा विजय झाला !

swarit