HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात ‘निर्लज्ज’ असा शब्द उच्चारला!

मुंबई | आज (३ मार्च) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जूंपलेली पाहायला मिळाली. दरम्यान, या सगळ्या मुद्यावरुन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.बाळासाहेबांची वेळोवेळी आठवण काढली म्हणून मी तुमचा आभारी आहे. पण बाळासाहेबांच्या मुद्द्यावर विरोधकांना हिंदुत्वाची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना करून दिली. बाबरी पाडल्यानंतर एरे गबाळे पळून गेले, पण तिथे फक्त बाळासाहेबच फक्त उभे राहिले.

“बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. पण आता राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्य़ाठिकाणी राम मंदिर बांधण्यात येणार आहे. या राममंदिरासाठीचा पैसा जनतेने दिला आहे. पण आमच नाव यायला हवे असा हट्ट होत आहे. बाळासाहेबांची सत्ता नव्हती पण काश्मिरी पंडितांना स्थान आणि रोजीरोटी मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांचे प्रयत्न होते. काश्मीर हिंदू पंडित निर्वासित झालेले असतानाच त्याठिकाणीच तुम्ही सत्तेमध्ये फुटीरतावाद्यांना आणि अफझल गुरूचे गोडवे गाणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात असे सांगत त्यांनी भाजपवर तोफ डागली. निर्वासित झालेल्या काश्मिरी पंडितांना किती घरे दिली असे सांगावे”, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

“सभागृहात निर्लज्जपणाने हा शब्द वापरतो आहे. निर्लज्जपणाने हा शब्द मी वापरतो आहे कारण बाळासाहेबांच्या खोलीत झालेली महाराष्ट्रासाठीची आत ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर पडून नाकारता हे तुमच हिंदुत्व आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. बाळासाहेबांची ती खोली आमच्यासाठी मंदिर होती. २०१४ मध्ये युती तुम्हीच तोडली. आम्ही तेव्हाही हिंदू होतो, आताही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून मरणार.शर्जील उस्मानी युपीतील घाण आहे, आमच्याकडची नाही असे सांगतानाच विरोधक आता शर्जील उस्मानीला शोधण्यासाठी पाताळात कधी जाणार ? राम मंदिर जरी उत्तर प्रदेशात होत असले तरीही देशद्रोही पिळावळ युपीत वाढते आहे. त्यामुळे त्याला अटक केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी युपीने आम्हाला मदत करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्याठिकाणी राम मंदिर होत आहे, त्याठिकाणचा पाया ठिसूळ असलेले राम मंदिर बांधत आहेत”, असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाट जळीत कांड : न्यायालयात पीडितेची बाजू वकील उज्जवल निकम मांडणार

swarit

“लज्जास्पद आहे कंगना राणावत”, उर्मिला- कंगना वादावर डॉ. माधुरी कानिटकर यांची प्रतिक्रिया

News Desk

चला पुन्हा एकदा रामराज्य प्रस्थिपात करुयात, सुशांतच्या बहिणीचा सल्ला

News Desk