HW News Marathi
महाराष्ट्र

बोगस मतदान रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिले निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई | निवडणुकीमध्ये बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्डशी जोडावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. लोकसभेत भरगोस यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत देखील अशीच पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत देखील भाजपने मोर्चे बांधणीला सुरुवता केली आहे. भाजपने बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून पक्षाचा पाया भक्कम करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण ऑगस्ट महिना राज्य पिंजून काढणार आहेत.

राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही यात्रा जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शिवशाही सरकार आणायची आहे. ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या २८८ जागांवर निवडणूक होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३ हजार कोटींची बेकायदेशीर उलाढाल करणाऱ्या मुंबईतील टॅंकर माफियांवर कारवाई करा! – आशिष शेलार

Aprna

५ राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत रिपाई देखील शर्यतीत उतरणार

News Desk

दोनो रणजीत है,अटल अभी जीत है

News Desk