HW News Marathi
महाराष्ट्र

“तुम्हा सगळ्यांना मीच पुरुन उरेल…”, चित्रा वाघ भडकल्या

मुंबई | “आज माझे फोटो मॉर्फ केले गेले. मला फोन येतायत. कापून टाकू, मरुन टाकू अशा धमक्या येत आहेत. आज तर माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाला. माझे कुठेही कारखाने नाहीत. या गुन्ह्याबद्दल कसलीही चिठ्ठी आली नाही. मला या गुन्ह्याबद्दल अजूनही माहीत नाही. माझ्या पतींना चित्रा वाघ यांचा पती असल्याची सजा मिळत आहे. पोलिसांनी व्हॉट्सअ‌ॅपवर नोटीस पाठवली. त्यांना एवढी घाई झाली का?, ” अशी घणाघाती टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन सरकारला धारेवर धरलेलं आहे. त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, आज त्यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. त्या आद (२७ फेब्रुवारी) नाशिकमध्ये पत्राकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

मारून टाकून कापून टाकू, धमक्या येत आहेत

“आज माझे फोटो मॉर्फ केले गेले. मला फोन येतायतं. कापून टाकून, मरुन अशा धमक्या येहीत नाही. आज तर माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाला. माझे कुठेही कारखाने नाहीत. या गुन्ह्याबद्दल कसलीही चिठ्ठी आली नाही. व्हॉट्सअ‌ॅपवर नोटीस पाठवण्यात आली. पोलिसांना एवढी घाई झाली का?, माझ्या नवऱ्याने एकही रुपया घेतला नाही. जनतेला हे समजायला पाहिजे,” असे चित्र वाघ म्हणाल्या. तसेच, या प्रकरणात ज्याने पैसै घेतले त्याची अजून चौकशीच सुरु आहे. मात्र, माझे पती म्हणजेच किशोर वाघ हे तिथे उपस्थितच नव्हते, त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल केला गेला. असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

माझ्या नवऱ्याला त्रास दिला जातोय, दबाव टाकला जातोय

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “माझ्या नवऱ्याला त्रास दिला जातोय. आम्ही आमच्या संपत्तीचा सगळा हिशोब दिला आहे. विरोधकांना मला गुंतवायचं आहे. आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. मात्र, माझ्या नवऱ्याला मानसिक त्रास दिला जातोय. छळलं जातंय,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच “त्यांनी गुन्हा दाखल केला तर काहीही फरक पडत नाही. आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढू. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायव्यवस्था या सरकारसारखी मुर्दाड नाही,” अशी घणाघाती टीकाही वाघ यांनी केली आहे.

तुम्हा सगळ्यांना मीच पुरून उरणार

यावेळी बोलताना पोलिसांनी कितीही गुन्हे दाखल केले तरी डगमगणार नसल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. “राज्यात एका मुलीचा खून झाला. तिला मारून टाकण्यात आलं. मी याबद्दल बोलले म्हणून माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तुम्हाला वाटलं मी शांत बसेल?, पण तुम्हा सर्वांना मीच पुरुन उरणार आहे आणि तसं झालं नाही तर चित्रा वाघ असं नाव सांगणार नाही, ” असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ ७ महत्त्वाचे निर्णय

News Desk

खडकवासला ओव्हरफ्लोल, उजनीचा साठा वाढणार

News Desk

बालभारतीच्या ८ वीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याऐवजी कुरबान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख 

News Desk