HW News Marathi
महाराष्ट्र

आंदोलनाचा प्रतिसाद म्हणजे जनतेच्या मनात सरकारबद्दलचा असंतोष

मुंबई | विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (२५ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा महिला सुरक्षेचा प्रश्न भाजप सध्या ठाकरे सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करत आहे. भाजपचे सर्व आमदार मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. सामान्य जनतेनेही या आंदोलनाला प्रतिसाद दिला. जनतेचा प्रतिसाद पाहत महाविकास आघाडीच्या सरकारचा विरोध केला असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडले.

राज्यभरातून आज ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलने झाले. बीड जिल्ह्यातूनही प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी आंदोलन केले. तसेच, हिंगणघाट, पुणे येथेही लोकं रस्त्यावर उतरताना दिसली. शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी हे सरकार आले नसून त्यांची फसवणूक या सरकारने चालवली आहे आणि हाच रोष लक्षात घेत आज लोकं या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे चेद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सरकारला धक्का लागेल असे आजचे आंदोलन होते. जनता या सरकारविरोधात आहेत म्हणून ते आज रस्त्यावर उतरले होते. आज संध्याकाळी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहोत. कोल्हापूरचे भाजप अध्यक्ष समरजीत घाडगे यांनी जिल्ह्यात फिरून राज्यपालांना पत्र लिहिण्याचं लोकांना आवाहन केलं होतं. अशी ५२ हजार पत्र त्यांनी गोळा केली. त्यातली काही पत्र लोकांनी आपल्या रक्ताने लिहिली आहे. यातून लोकांचा सरकारविरोधातील संताप दिसून येतो. ही सर्व पत्र घेऊन समरजीत घाडगे मुंबईत आले आहेत. ही पत्र आम्ही राज्यपालांना सुपुर्द आहोत, अशी माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतसिंग प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल !

News Desk

विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज, निलेश राणेंचा प्रहार

News Desk

#Lockdown : सोशल मीडियावर धार्मिक रंग देणाऱ्यांवर सायबर सेलची कारवाई

News Desk