HW News Marathi
महाराष्ट्र

सीएए म्हणजे कुणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही, मुख्यमंत्र्यांचे समर्थन

मुंबई | “नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) म्हणजे कुणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही,” असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीएएला समर्थन केले आहे. तर “नागरिकत्व सिद्ध करणे हे केवळ मुस्लमांना नाही तर हिंदूनासुद्धा जड जाईल. तो कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी एनआरसी विरोधात घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत नागरिकत्व दुरुस्ती कायदाला समर्थन आणि एनआरसीला विरोध दर्शवित, राज्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे मोठे विधान केले. या मुलाखतीचा प्रोमो नुकताच सामनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आता सीएए कायद्यावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असे चित्र निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सामनाच्या मुलाखतीचा प्रोमो

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका काय?, असा प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “सीएए म्हणजे कुणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही.” तसेच, बांग्लादेशी किंवा पाकिस्तानी घुसखोर जे आहेत त्यांना हाकलावंच लागेल या भूमिकेशी आपण ठाम आहात का?, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. मुख्यमंत्री म्हटले की, नागरिकत्व सिद्ध करणे हे केवळ मुस्लमांना नाही तर हिंदूनासुद्धा जड जाईल. तो कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी एनआरसी विरोधात घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट बनवत पैशांची केली मागणी

News Desk

भाजपचे साडेतीन लोकं कोठडीत जातील, उद्या पर्दाफाश करणार; राऊतांचा इशारा

News Desk

राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार घड्याळ सोडून हातात शिवबंधन बांधणार

News Desk