HW News Marathi
महाराष्ट्र

तुमच्याकडे आरोपी पण आमच्याकडे एक तक्रारदारच गायब! परमबीर सिंहांवरून मुख्यमंत्र्यांचा टोला

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली. “तुमच्याकडे एक आरोपी गायब आणि आमच्याकडे एक तक्रारदारच गायब आहे. कुठे गेला काय माहीत”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.

“१९५८ सालापासून एक आरोपी गायब असल्याचं तुम्ही म्हणता. अहो, चंद्रचूड साहेब आमच्याकडे तर तक्रारदारच गायब आहे. तरीही केस सुरू आहे. तक्रारदार गायब आहे, कुठे पळून गेला माहीत नाही. पण आता तक्रार केलीय ना मग खणून काढ, खणलं जातंय, चौकशा, धाडसत्रं सुरू आहे. याला चौकट आणण्याची गरज आहे”,असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, पण मी…!

“खंडपीठाचा इतिहास उपस्थितांना माहीत आहे. मला वाटतं की, ही इमारत पाहण्यासाठीही लोकं आली पाहिजेत. त्यांना पकडून आणण्याची वेळ येऊ नये. मराठीत एक म्हण आहे की, शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये. पण माझं होतं असं कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं कोर्टात येणं जाणं होतं. असं उद्धव ठाकरे मिश्कीलपणे म्हणाले.

न्यायदानात गती आणण्यासाठी आम्ही…!

पुढे मुख्यमंत्र्यांनी असं आश्वासनही दिलं आहे की, “न्यायादान प्रक्रियेत विलंब झाला की सामान्य माणूस पिचून जातो. त्यामुळे, आता न्यायदानात गती आणण्यासाठी सरकार म्हणून जे करायचं ते आम्ही करूच.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुरूनानकजींच्या मानव कल्याणाच्या विचारांमुळे शीख बांधवांचे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान!- मुख्यमंत्री

Aprna

CBI, ED काहीही असू द्या, काहीही झालं तरी सरकार, आमदार, नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत – संजय राऊत  

News Desk

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कामगार संघटनांनी दिली संपाची हाक

Aprna