HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोद्धेला राममंदिर भूमिपूजनाला जाणार नाहीत !

मुंबई | ५ ऑगस्टला अयोध्येत राममंदिर भूमिपूनाचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. त्याचे उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. “पंतप्रधान जात आहेत हे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री तिथे केव्हाही जातील”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“ज्याप्रकारे अयोध्या आणि त्याच्या आसपास कोरोना संक्रमणाचा कहर आहे. संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही मंत्र्याना देखील लागण झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे कमीत कमी लोकांनी जावे. आणि जो रखडलेला भूमिपूजन सोहळ्याचा मुहूर्त आहे तो पाळावा. या सोहळ्याला पंतप्रधान जात आहेत हे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री केव्हाही जातील. निमंत्रणासाठी कोणी थांबलं नाही आहे. सध्या परिस्थितीत समजून घेणे गरजेचे आहे”, असे स्पष्ट संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादेतील दंगलीत पोलिस कार्यकर्त्यांसारखे वागले | धनंजय मुंडे

News Desk

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाही !

swarit

आमदार दानवेंची बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण, औरंगाबादेत तक्रार दाखल

News Desk