HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीनंतरच महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार – उदय सामंत

मुंबई | कोरोना काळातील पहिल्या लॉकडाऊनपासून बंद असलेली शाळा महिविद्यालय सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे समजते आहे. दिवाळी नंतर परिस्थिती पाहून सरकार महाविद्यालय सुरु करण्याबद्दल निर्णय घेईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतही आता शाळा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी शाळेतील प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. या पूर्वतयारीमध्ये शाळा पूर्णतः सॅनिटाईज करणे, शाळेतील बाक आणि वर्गांची साफसफाई करणे, प्रयोगशाळांमध्ये साफसफाई करणे, अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच शाळा प्रशासनाने पालकांशी सल्लामसलत करून नवीन नवीन उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. दादर मधील साने गुरुजी विद्यालयात देखील अशीच लगबग आम्हाला बघायला मिळाली.

नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता महाविद्यालय सुरू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वीत सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दिवाळीनंतर महाविद्यालयं देखील सुरु करण्याची सरकारची तयारी सुरू आहे.ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे. अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देता आली नाही. त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटीच्या परीक्षा झाल्याशिवाय, त्याचा निकाल लागल्याशिवाय कॉलेज सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे ही परीक्षा लांबली तर महाविद्यालयं सुरू करण्याची तारीख अजून पुढे जाईल. ज्याठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही. याविषयी राज्य कृती दल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच… जयंतरावांचं अचूक नियोजन, भाजपचा टप्प्यात कार्यक्रम !

News Desk

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी-भाजपच्या ‘या’ दोन उमेदवारांची मालमत्ता 100 कोटीच्या घरात

Aprna

पुण्यात मेट्रोच्या बांधकामादरम्यान ड्रील मशिन कोसळली

News Desk