HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय सलोखा राखावा म्हणून अमल महाडिकांकडून विधान परिषदेचा अर्ज मागे

मुंबई | राजकीय सलोखा राखावा म्हणून अर्ज मागे घेतल्याची माहिती भाजप उमेदवार अमल महाडिक म्हणाले. महाडिकांनी विधानपरिषेदेचा अर्ज मागे घेल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची निवड बिनविरोधी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (२६ नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चाकरून अमल महाडिक यांनी विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. महाडिकांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी भाजपला मुंबई आणि धुळे-नंदुरबाच्या बदल्यात कोल्हापूरची जागा सोडल्याची माहिती महाडिकांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कोणत्याच निवडणुका पार पडल्या नाहीत. राज्यात राजकीय सलोखा राखावा म्हणून विधानपरिषदेचा अर्ज मागे घेतल्याचे महाडिकांनी माध्यमांशी बोलताना सांगतिले. आगामी निवडणुका भाजपच्या झेंड्याखाली लढणार असल्याचे महाडिकांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर

News Desk

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

News Desk

“उदय सामंत स्वतःच्या गाडीतून पाणी काढून देणार का” चिपळूण दौऱ्यावर असतांना निलेश राणे भडकले..!

News Desk