HW News Marathi
महाराष्ट्र

“रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तरी असे भ्रम होतात”, फडणवीसांच्या “त्या” वक्तव्यावर काँग्रेसची टीका

मुंबई। माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचं “मी पुन्हा येईन” हे वाक्य चांगलच चर्चेत राहिलं होतं संपूर्ण महाराष्ट्राला हे वाक्य परिचित आहे. आणि आता देखील देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा असंच एक विधान करून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय. नवी मुंबईत फडणवीस बोलताना म्हणाले होते. मला आज हि वाटतं मीच मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच ट्रोल झालेत. त्यावरून आता काँग्रेसकडून देखील टीका करण्यात आली.

मी मुख्यमंत्री नाही मला असं वाटतं की आजही मीच मुख्यमंत्री

नवी मुंबई कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गणेश नाईक, भाजपा आमदार मंदा म्हात्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांना उल्लेखून हे विधान केल्यानंतर सोशल मीडियावर ते चांगलंच व्हायरल झाले, गणेश नाईक, मंदा म्हात्रे, पाटील साहेब तुमच्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्री आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले होते आणि म्हणूनच आता त्यांच्यावर काँग्रेसचे सचिन सावंत यांनी टीकेचे बाण सोडले.

लवकरात लवकर डॉक्टरला दाखवणे गरजेचे आहे

देवेंद्र फडणवीस यांच्या याच वक्तव्याचा आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्याकडून समाचार घेण्यात आलाय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करून फडणवीसांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. “कल्पनेतही नसताना मविआ सरकार स्थापन झाले हा झटका मोठा होता याची जाणीव आहे. मानसिक धक्क्यातून अनेकदा अशा प्रकारची लक्षणे उद्भवू शकतात. रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तरी असे भ्रम होतात म्हणे! लवकरात लवकर डॉक्टरला दाखवणे गरजेचे आहे. आधीच दोन वर्षे अंगावर काढली आहेत, काळजी घ्यावी!” असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंना पक्ष सोडायचाच होता तर रिपाई चांगला पर्याय होता – रामदास आठवले

News Desk

कॅग’च्या अहवालाने मागील सत्ताधाऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला 

News Desk

मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे केले वाटप

News Desk