HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसकडे आज हवं तसं नेतृत्वच नाही, नारायण राणेंची बोचरी टीका

मुंबई | “काँग्रेसची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे. काँग्रेसकडे आज हवं तसं नेतृत्व नाही. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण आहेत. मात्र, अध्यक्षपद सांभाळण्याची क्षमता कुणातही नाही”, अशी बोचरी टीका भाजप खासदार नारायण राणेंनी केली आहे. सध्या काँग्रेसच्या नेतृत्त्वाबद्दलची आणि पक्षाच्या पुनर्बांधणीची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच पक्षात सध्या मोठे संभ्रमाचे वातावरणही आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देखील पक्षातील अनेक समज-गैरसमज समोर येत आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन नेत्यांमध्ये २ वेगळे गट आहेत. त्यामुळे, हा तिढा सोडवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता नारायण राणेंनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

“काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून जेवढे वाद होतील तेवढे पक्षाचे खच्चीकरण होईल. नेते, कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळेल.काँग्रेसच्या कार्यपद्धतीला आता पक्षातीलच नेते कंटाळले आहेत. म्हणून या नेत्यांनी पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक सुरू असली तरीही अद्याप कुणाच्याच नावावर एकमत झालेले नाही. राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. तर गांधी कुटुंब वगळता दुसऱ्या कोणाच्या नावाची शिफारस करताना कोणी दिसत नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदावर एकमत होणे कठीण आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण आहेत. कोणात जर क्षमता असेल तर त्यांनी बोलावे कि आम्ही अध्यक्षपद सांभाळतो. मात्र, एकाही तरुणात तेवढी क्षमता दिसत नाही”, असे नारायण राणे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पद्मनाभस्वामी मंदिराचं व्यवस्थापन आता राजघराण्याकडे

News Desk

Ayodhya Verdict : मध्यस्थी समितीची नेमणूक

News Desk

#Results2018 : तेलंगणामध्ये एआयएमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी

News Desk