HW News Marathi
देश / विदेश

नमो अ‍ॅप देखील बंद केले पाहिजे, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई | परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अ‍ॅपवर देखील बंद केले पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “१३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अ‍ॅप देखील बंद केले पाहिजे.”

पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारतात चीन विरोधात प्रचंड रोष आहे. अशात सोमवारी म्हणजेच २९ जून रोजी रात्री उशिरा भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक केला. ५९ चिनी अॅप्सवर भारताने बंदी घातल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. टिक-टॉक, यूसी ब्राऊझर, झेंडर, शेअर इट, क्लीन मास्टर यांसारख्या अॅप्सचा समावेश आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे भाजपची नाव न घेता तक्रार

News Desk

मी शिवरायांचा अपमान केला नाही, उलट…! व्यंकय्या नायडूंची पहिली प्रतिक्रिया

News Desk

जी-२३ नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर! – नाना पटोले

Aprna