HW News Marathi
Covid-19

पश्चिम बंगालच्या पराभवामुळे चंद्रकांत पाटील डिस्टर्ब झालेत !

मुंबई । काँग्रेस नेते तसेच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजप नेत्यांनी 205 जागा जिंकण्याचा दावा केला होता. पब भाजपला सत्तेचा सोपान गाठता आला नाही. याच पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झाले आहेत. टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याची ताकद ठेवायला हवी”, अशी बोचरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

देशातील ५ राज्यांच्या निवडणुका आणि कोरोनाचा हाहाकार याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “निवडणुका जिंकण्याच्या हव्यासापोटी देशात बिकट स्थिती निर्माण झाली. इतर राज्यांनी आकडे लपवले. मात्र, महाराष्ट्राने तसे केले नाही.” त्याचप्रमाणे, “दरदिवशी लाखोंच्या संख्येने रुग्ण वाढत असूनही लॉकडाऊन का घोषित केला जात नाही?” असा सवालही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाशी लढण्यासाठी मनमोहन सिंग यांचे नरेंद्र मोदींना ‘हे’ सल्ले

News Desk

देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ६,५६६ नवे रुग्ण, तर १९४ करोनाबाधितांचा मृत्यू

News Desk

भारताला केवळ सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे का? त्यापूर्वी हा देशच नव्हता का?, सामनातून भाजपला सवाल

News Desk