HW News Marathi
महाराष्ट्र

नाना पटोले आणि कॉंग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!संजय राऊतांची तक्रार केली का?

मुंबई | UPA च्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्याकडून सुरु असलेल्या लॉबिंगमुळे नाराज असलेले काँग्रेसचे नेते आज (३ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने एच.के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते.मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत कॉमन मिनिमम प्रोगामच्या अनुषंगाने चर्चा झाली. याशिवाय, निधी वाटप, राज्यमंत्र्यांचे अधिकार आणि महाविकासआघाडीत नसेलला समन्वय या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या तक्रारी लवकर सोडवाव्यात, असे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे

.दरम्यान, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणामुळे कॉंग्रेसची नाहक बदनामी होत आहे. याची कॉंग्रेसच्या हायकमांडने दाखवल्याचे वृत्त होते. याच मुद्दयाला धरुनही आज कॉंग्रेसच्या नेत्यांनी कॉंग्रेसची सचिन वाझे प्रकरणात बदनामी झाल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. तसेच, या सगळ्या प्रकरणामुळे आमच्यावरही विनाकारण शिंतोडे उडाले, असा नाराजीचा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी लावला होता.

नाना पटोले काय म्हणाले?“काँग्रेस मंत्र्यांना मिळत असलेल्या निधीवाटपावरुन अनेकांमध्ये नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिक निधी मिळतो आहे. या प्रकरणावर आम्ही विस्तृत चर्चा केली. याव्यतिरीक्त सचिन वाझे, मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरही आमची चर्चा झाली”, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

लक्षात ठेवा, ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा रोखठोक इशारा

गेल्या काही दिवसांत काँग्रेसने ठाकरे सरकारला दोनदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.

काय म्हणाले होते संजय राऊत?

“देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असं वाटत असेल, तर युपीएचं नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावं”, असं राऊत म्हणाले आहेत. “आत्तापर्यंत सोनिया गांधींनी हे नेतृत्त्व उत्तम पणे केलं आहे. पण युपीएची ताकद सध्या कमी झाली आहे. सोनिया गांधींची प्रकृती बरी नसते. त्या आता सक्रिय राजकारणात फार दिसत नाहीत. देशात सध्या अनेक प्रादेशिक पक्ष एनडीए किंवा युपीएमध्ये नाहीत, पण त्यांना भाजपविरोधात उभं राहण्याची इच्छा आहे. या पक्षांना युपीएमध्ये आणण्यासाठी शरद पवार हेच नाव मला दिसतं आहे”, असं राऊत यावेळी म्हणाले.

UPAची चिंता संजय राऊतांनी करु नये !

नाना पटोले यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतांच्या UPAच्या नेतृत्वाबद्दलच्या भूमिकेबाबतही इशारा दिला आहे. शरद पवार यांनी UPAचे नेतृत्व करावे या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. नाना पटोले म्हणाले कि, “संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? शिवसेना ही UPAची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. सोनियाजी गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. UPAची चिंता संजय राऊत यांनी करु नये”, असेही नाना पटोलेंनी बजावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा

News Desk

राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…!

News Desk

पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालेे , सदाभाऊ खोतांची जहरी टीका

News Desk