HW News Marathi
Covid-19

पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर…!; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश

मुंबई । गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यासह देशाला काहीसा दिलासा मिळालेला असताना आता पुन्हा एकदा आपली चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक देशांमध्ये सध्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याची वृत्त समोर येत आहेत. जगभरातील विविध देशांमध्ये आढळून येणाऱ्या या स्थितीच्या पार्श्वभूमीवर आपल्या केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने महत्त्वाची पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, आज (२८ नोव्हेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व यंत्रणांना सतर्क होण्याचे स्पष्ट आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, “कोरोनाच्या नव्या धोकादायक व्हेरीयंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व करा. केंद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा. जर पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर आरोग्यासंबंधीची बंधने पाळावीच लागतील.” तसेच विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे पूर्णपणे लक्ष देण्याबाबतचे निर्देश देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने थोड्याच वेळापूर्वी याबाबतचं ट्विट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण डोंबिवलीत ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ! जाणून घ्या नवी नियमावली…

News Desk

Dr. Avinash Bhondwe HW Exclusive : डॉक्टरांवर हल्ले का होत आहेत ?

News Desk

मी पंढरपूरला जाणार, विठुरायाकडे कोरोनाचे संकट नष्ट करण्याचे साकडे घालणार | उद्धव ठाकरे

News Desk