HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात आणखी काही ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा देण्यासाठी केंद्राकडे मागणी

मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा अथक प्रयत्न करत आहे. त्यामूळे राज्यात प्रत्येक ठिकाणी कोरोना चाचणीची परवानगी केंद्र सरकारकडून मिळण महत्त्वाचे आहे. नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती या ठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी. तसेच, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलद गतीने करावे, रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किट्सही उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१० एप्रिल) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.

राज्यात कोरोनाची स्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. मुंबईत तर अपेक्षेपेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. ही वाढ चिंताजनक असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राज्य शासनामार्फत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्यासाठी आवश्यक असणारे पीपीई किट्स, एन ९५ मास्क याबाबत केंद्र शासनाकडे मागणी यापूर्वीच केली असून हे सर्व साहित्य वेळेवर उपलब्ध करून दिल्यास त्याचे वितरण राज्यभरात करणे सोयीचे होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर महिलेने केला बलात्काराचा आरोप,तृप्ती देसाईंनी पीडीतेला आणले समोर…

News Desk

#Coronavirus : धक्कादायक ! पुण्यात ४ तासांत ४ जणांचा मृत्यू

News Desk

शिवसेना नेते संजय राठोड आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

News Desk