HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ | जयंत पाटील

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान सुरू करण्यात आले होते.मात्र अनेकांना अजूनही अभिप्राय नोंदवता आला नसल्याने या अभिप्राय अभियानाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

अभियानात अभिप्राय नोंदवण्याची अंतिम तारीख ही २५ जून होती परंतु अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपले अभिप्राय अद्याप नोंदवता न आल्याने त्यांनी अभियानाची मुदत वाढवण्याची विनंती केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी पक्षाने अभिप्राय अभियानाची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली आहे.

या अभियानाला सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आतापर्यंत जवळपास ३ लाख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला असून त्यांचे मनोगत अभियानाद्वारे पक्षापर्यंत पोहोचवले आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी याची नोंद घेवून दिनांक ३० जून रोजी रात्री १० वाजेपर्यंत आपला अभिप्राय नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी माहिती घ्या, मग आरोप करा मलिकांचा पटोलेंवर पलटवार…!

News Desk

जळगाव: महिला वसतिगृहात काय झाले याची माहिती न घेता जळगावची बदनामी करु नका, खडसेंनी भाजपला ठणकावले

News Desk

लॉकडाऊन कालावधीत १२२१ गुन्ह्यांची नोंद ,२ कोटी ८२ लाखाचा मुद्देमाल जप्त

News Desk