HW News Marathi
Covid-19

जाणून घ्या… मुंबईत कोणत्या वेळेत असणार संचारबंदी

मुंबई | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात तिसरे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या तिसऱ्या लॉकडाऊनला आजपासून (४ मे) सुरू झाला असून १७ मेपर्यंत असणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची संख्या असून राज्यातील मुंबई आणि पुणे हे कोरोनाचे हॉस्टस्पॉट बनले आहे. यापार्श्वभूमीवर आज रात्री ८ ते सकाळी ७ वेळात मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात क्लिनिक्स, रुग्णालय आणि मेडिकल्स यांना वेळेतून मुभा देण्यात आली आहे.

तसेय यावेळेत वैद्यकीय कर्माचाऱ्यांशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असे पत्रक मुंबई पोलीस आयुक्तांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात संचार बंदी कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ यानुसार हे आदेश जाहीर करण्यात आले आहे. मुंबईतील बहुतांश भाग रेड झो असून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचमुळे मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १७ मेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची लस आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी लोकांसमोर येऊन घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी

News Desk

ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या दाव्यावर राऊत म्हणाले…

News Desk

आता RTPCR चाचणी करा फक्त ५०० रुपयांत! 

News Desk