HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी विभागावर केलेल्या आरोपांची चौकशी करू – दादा भुसे

अमरावती | कोरोना रोगाचा फटका, दूध दरवाढ मिळत नसल्याने आर्थिक तोटा, बोगस बियाणं, वादळ, मान्सून, कीड, खतांसाठी करावा लागणार खटाटोप अशा सर्वच प्रतिकूल परिस्थितीतुन शेतकऱ्यांना जावं लागत आहे. यावरूनच आता राज्यमंत्री बच्चु कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर देत कृषी विभाग झोपले आहे का असा प्रश्न विचारला आहे.

राज्यमंत्री बच्चु कडू यांनी केलेल्या आरोपांवर आता कृषीमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कृषी विभाग हे शेतकऱ्यांच्या प्रति गंभीर नाही, अशी कोणतीही परिस्थिती नाही. ज्या गोष्टी गोष्टी समोर येत असतात त्याचा निपटारा करण्याचे काम हे कृषी विभागाकडून केले जात आहे’, असा खुलासा भुसेंनी केला आहे.पूढे त्यांनी, ‘राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या काही ज्या सूचना आहे. त्यांचा विचार केला जाईल. बच्चू कडू यांनी जे आरोप केले त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असे स्पष्ट केले आहे.

ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री बच्चू कडूंनी कृषी विभागाला लक्ष्य केले. ‘सोयाबीन पिकवणारा शेतकरी यंदा पूर्णपणे घायाळ करून टाकला आहे. पेरलं तेव्हा निघालं नाही आणि पीक हातात आलं तेव्हा मारून टाकलं. राज्यातलं कृषी खातं झोपलंय की काय अशी स्थिती आहे. जेव्हा बियाणांचं प्रमाणीकरण होतं, त्यावेळी काही बदमाशी होते का, असा प्रश्न मला पडतो. महाबीजनं बाजारातलं बियाणं घेतलं असा माझा स्पष्ट आरोप आहे. बाजारातून सर्वात निकृष्ट बियाणं २-३ हजार रुपये क्विंटल दरानं खरेदी करून ८ हजार रुपये क्विंटल दरानं विकलं,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण प्रकरणी भाजपच्या या नेत्यांवर गुन्हा दाखल

News Desk

कथित 19 बंगला घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

Aprna

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर राऊत यांना देशद्रोही विचारच सुचणार – अतुल भातखळकर

News Desk