HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे म्हणाले, “सीएम बीएम गेला उडत”, अजित पवार म्हणतात, “ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”!

मुंबई | राज्यात पावसामुळे आलेल्या पुराचा फटका कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूरला बसला. पुर आल्यामुळे लोकांचं संसार, घर सगळं काही उद्ध्वस्त झालं. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विरोधी पक्ष नेते दौरे करत आहेत. २ दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यावेळी अधिकाऱ्याला झापत सीएम बीएम गेला उडत असं म्हणत मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंना सुनावलं आहे.

मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती

“काही नेतेमंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. प्रत्येकाला हा दौरा करण्याचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. मात्र काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती. आणि ही महाराष्ट्राची संस्कृतीही नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

ते लोक दौरा अधिकार्‍यांना पाहण्यासाठी करतात का? मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे.

‘सीएम वगैरे गेला उडत.. इथे तुम्ही का नाही ते सांगा’

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे (२६ जुलै) चिपळूण मध्ये पूर्वपरिस्थितीचा आढावा घेत होते. चिपळूणच्या दौऱ्या दरम्यान अधिकारी उपस्थित नसल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. व्यापाऱ्यांनी जेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर आल्या व्यथा मांडल्या त्यानंतर नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून झापलं. यावेळी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत असताना त्यांचा तोल ढळला ‘सीएम वगैरे गेला उडत.. इथे तुम्ही का नाही ते सांगा’, फोनवर असं म्हटलं आहे.

राणे का भडकले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल(२५ जुलै) चिपळुमनधल्या पुराचा आढावा घेत होते. त्यावेळी, ‘सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत अधिकारी सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. मग इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आत्तापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही. मला कुणीही सीईओ वगैरे भेटलेला नाही, मी बाजारपेठेतच उभा आहे, कुठे आहेत सीईओ दाखवा’ असं म्हणत नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झपलं आहे.

मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचा

नारायण राणे हे चिपळूण दौऱ्यावर आहेत . तिथली पाहणी करून झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “याला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण..आल्यापासून वादळं काय? पाऊस काय? सर्व चालुच आहे. करोना काय? करोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री आले करोना घेऊन आले. पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा”, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

“पाठांतर करून यायचं आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचं. या राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही. लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवं होतं. जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारने करायला हवं होतं. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे.”, असा निशाणाही त्यांनी साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लॉकडाऊनचा पुनर्विचार करा अन्यथा…”, उदयनराजेंचा गंभीर इशारा!

News Desk

Live Update : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

News Desk

समीर वानखेडेंच्या जीवाला धोका, केंद्राने दिली Z Plus सुरक्षा

News Desk